संगमनेर कारागृहातून चार कैद्यांचे पलायन!

फरार झालेल्या कैद्यांवर बलात्कार, खून, दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यांच्या नोंदी

संगमनेर कारागृहातून चार कैद्यांचे पलायन!

अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील पोलीस ठाण्याच्या कारागृहाचे गज तोडून चार कैदी फरार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला आहे.फरार झालेल्या कैद्यांवर बलात्कार, खून, दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे समोर आले आहे.मात्र, या घटनेनंतर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील कारागृहात या चार कैद्यांना ठेवण्यात आलं होतं. बुधवारी पहाटेच्या सुमारास या कैद्यांनी कारागृहाचे गज तोडून पळ काढला.राहुल काळे, मच्छिंद्र जाधव, रोशन थापा ददेल,अनिल काळे असे जेलमधून पसार झालेल्या आरोपींची नावे आहेत.यावेळी चार पोलीस कर्मचारी ड्युटीवर असताना देखील गुन्हेगारांनी पळ काढल्याने संगमनेर पोलीस सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.या आरोपींवर बलात्कार, खून दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंदी आहेत.फरार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पाच पथके रवाना करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी दिली आहे.

हे ही वाचा:

अलाहाबाद विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आता श्रीकृष्णाचे व्यवस्थापन धडे

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ११ निर्णयांना मान्यता!

शुभमन नंबर वन!

नीतिश कुमारांना मोदींचा टोला; आणखी किती खाली घसरणार?

या कारागृहातील कैद्यांना गुटखा, तंबाखू, बाहेरचे जेवण, मोबाईल आदी सुविधा सहज उपलब्ध होत असल्याचा आरोप अनेकदा झाला आहे. या प्रकरणामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्य न दाखवल्याने चार जणांनी गज कापून पलायन केले असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे. दरम्यान जेलमधून कैदी पळून गेल्याने संगमनेर पोलिसात खळबळ उडाली आहे.

 

Exit mobile version