31 C
Mumbai
Wednesday, April 9, 2025
घरदेश दुनिया“अवामी लीगचे एक लाखाहून अधिक सदस्य भारतात पळून गेले”

“अवामी लीगचे एक लाखाहून अधिक सदस्य भारतात पळून गेले”

बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे माहिती सल्लागार महफुज आलम यांचा दावा

Google News Follow

Related

बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे माहिती सल्लागार महफुज आलम यांनी दावा केला की, पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीगचे एक लाखाहून अधिक सदस्य भारतात पळून गेले आहेत. त्यांच्या या दाव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ढाका येथे आयोजित ईद मेळाव्यात आलम यांनी ही टिप्पणी केली. या कार्यक्रमात शेख हसीना यांच्या कार्यकाळात बेपत्ता झालेल्या किंवा मारल्या गेलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांनी सहभाग घेतला होता. मानवाधिकार गट ‘मेयर डाक’ने शहरातील तेजगाव परिसरात हा कार्यक्रम आयोजित केला होता.

बांगलादेशात विद्यार्थी आंदोलनाला मिळालेल्या हिंसक वळणानंतर शेख हसीना यांचे सरकार उलथवण्यात आले. नव्या अंतरिम सरकारच्या कार्यकाळात सध्या बांगलादेशात हिंदू मंदिरांना आणि हिंदूंना लक्ष्य करण्यात येत आहे. यावरून भारत आणि बांगलादेश यांचे संबंध ताणले गेले आहेत. बांगलादेशातल्या हिंसाचारनंतर माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला असून बांगलादेश सरकारने हा धक्कादायक दावा केला आहे. शेख हसीना यांच्या पक्षातील एक लाख लोक भारतात पळून गेल्याचा दावा बांगलादेश सरकारने केला आहे.

हसीना यांच्यावर टीका करताना महफुज म्हणाले की, त्यांनी तिच्या पालकांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी जबरदस्तीने बेपत्ता करणे आणि हत्यांचा वापर केला. २०१३ आणि २०१४ मध्ये जेव्हा लोक त्यांच्या मतदानाच्या अधिकारासाठी लढत होते तेव्हा जबरदस्तीने बेपत्ता होण्याचे प्रमाण सर्वाधिक होते. या कृतींमागील मुख्य उद्देश निवडणूक व्यवस्था नष्ट करणे हा होता, असा आरोप त्यांनी केला आहे. सरकारने जबरदस्तीने बेपत्ता करण्याच्या घटनांची चौकशी करण्यासाठी आधीच एक आयोग स्थापन केला आहे. आयोगाच्या शिफारशींच्या आधारे, जबरदस्तीने बेपत्ता करण्यात सहभागी असलेल्या अनेक व्यक्तींविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, इतर अनेकांविरुद्ध तपास अजूनही सुरू आहे. ज्यांनी अवामी लीगचा राजकीय विरोध केला त्यांना जबरदस्तीने बेपत्ता करण्यापूर्वी दहशतवादी आणि अतिरेकी म्हणून लेबल लावण्यात आले, असे आरोप करण्यात आले आहेत.

हे ही वाचा : 

चीनची चाटुगिरी फळली नाही, राहुलना चिनी चापट…

‘रस्ते वाहतुकीसाठी आहेत, प्रार्थनेसाठी नाहीत’, हिंदूंकडून शिस्त शिका!

‘राज्याचे नाट्यगृहधोरण दोन महिन्यात येणार’

…आणि अनंत अंबानींनी कोंबड्याच दुप्पट किमतीने विकत घेतल्या!

माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाचे एक लाखाहून अधिक सदस्य भारतात पळून गेल्याचे महफुज आलम यांच्या विधानाने नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. भारतात अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशींवर कारवाई सुरु असताना महफुज आलम यांनी हे धक्कादायक विधान केलं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
241,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा