देशभरात जशी जशी काँग्रेसची ताकद कमी होतेय तसा तसा हा पक्ष फुटीरवाद्यांच्या आडून देशाला अराजकाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करतोय. मुस्लीम मतांसाठी काँग्रेसची तडफड जगजाहीर आहे. वक्फ सुधारणा विधेयकाच्या निमित्ताने काँग्रेस पुन्हा एकदा मुस्लीमांना भडकावून देशात फाळणीच्या काळातील वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करते आहे. वक्फ सुधारणा बिल मंजूर झाले तर विकसित भारताचे स्वप्न साकार होणार नाही, असा धमकीवजा इशारा मुस्लीम गटांनी दिलेला आहे. काँग्रेसची भूमिका नेहमीप्रमाणे आगीत तेल ओतणारी आहे.