28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
घरविशेषहिंदूंच्या संरक्षाणासाठी चारही शंकराचार्य सरसावले !

हिंदूंच्या संरक्षाणासाठी चारही शंकराचार्य सरसावले !

बांगलादेशातील हल्ले त्वरित थांबवण्याची मागणी

Google News Follow

Related

शेख हसीना यांच्या हकालपट्टीनंतर बांगलादेशातील हिंदूंवर इस्लामवाद्यांकडून हल्ले होत असताना, भारतातील चार शंकराचार्यांनी हिंदुविरोधी हिंसाचाराचा निषेध केला आहे. पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी बांगलादेशातील हिंदूंच्या हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त करून हल्ले त्वरित थांबवण्याची मागणी केली आहे.

शांतता प्रस्थापित करून सर्व काही सोडवले जाऊ शकते. हिंदू हे शांतताप्रिय आहेत. जेव्हा हिंदू सुरक्षित असतात तेव्हा देश सुरक्षित असतो. बांगलादेशातील असा हिंसाचार हा चीनचा डाव आहे. चीनमध्ये मशिदी उद्ध्वस्त केल्या जात आहेत आणि मुस्लिमांना देशातून हाकलले जात आहे. आता चीन भारताला अस्थिर करण्यासाठी बांगलादेशचा वापर करत आहे. जर बांगलादेशने हे समजून घेतले नाही तर आगामी काळात त्यांचे अस्तित्व धुळीला मिळेल, असे निश्चलानंद सरस्वती म्हणाले.

हेही वाचा..

बांगलादेशातील महिला वर्ल्डकप आता दुबईत

बांगलादेशात हिंदुंवरील अत्याचार थांबता थांबेना !

उपनगरचा राजा, त्याचाच गाजावाजा!

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ

दरम्यान, द्वारका शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती म्हणाले की, भारत आणि बांगलादेशच्या सरकारने हिंदूंच्या दुर्दशेवर भेटून चर्चा करावी. पाकिस्तान आणि बांगलादेशातील हिंदूंची स्थिती चांगली नाही. गेल्या ५० वर्षांपासून जे घडत आहे ते योग्य नाही [हिंदूंचा छळ]. त्यांचा काय दोष ? त्यांना निवडकपणे का मारले जात आहे ? त्यांची मंदिरे का उद्ध्वस्त होत आहेत ? या समस्येवर लवकरात लवकर तोडगा निघायला हवा. तसे केले नाही तर जगभर हिंदू कुठेही राहतात, समस्या उद्भवल्यास त्यांना मदत करणारा कोणीही नसतो, असेही ते म्हणाले.

सदानंद सरस्वती यांनी भारतीय मुस्लिमांना बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या हत्या आणि लक्ष्यित हल्ले कोण करत आहेत यावर विचार करण्याचे आवाहनही केले. बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या हल्ल्यांनंतर, कांची शंकराचार्य शंकर विजयेंद्र सरस्वती अशांतताग्रस्त देशात शांतता आणि सामान्य स्थिती पुनर्संचयित करण्यासाठी विशेष प्रार्थना करत असल्याची माहिती आहे. त्यांनी बांगलादेशात शांतता, सुरक्षितता आणि स्थैर्याचे आवाहन केले. हिंदूंची लक्षणीय लोकसंख्या आणि ढाकेश्वरी मंदिर या शक्तीपीठासह विविध ऐतिहासिक हिंदू मंदिरांच्या अस्तित्वावर भर दिला.

दरम्यान, ज्योतिर्मथ शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी भारत सरकारला बांगलादेशातील इस्लामवाद्यांच्या हल्ल्यात हिंदूंना वाचवण्यासाठी उपाययोजना करण्याची विनंती केली. बांगलादेशी हिंदूंशी एकता व्यक्त करताना अविमुक्तेश्वरानंद यांनी प्रतिपादन केले की कोणत्याही देशात छळ होत असलेल्या हिंदूंचे भारतात हिंदूंच्या भूमीत स्वागत आहे.

बांगलादेशात हिंदूंचे संरक्षण झालेच पाहिजे. बांगलादेश सरकारने हे विसरू नये की हजारो बांगलादेशी भारतात राहतात. आम्ही सरकारला त्यांच्यासाठी जमीन आणि सुरक्षा प्रदान करण्याची विनंती करतो आणि आम्ही त्यांच्या अन्न आणि इतर गरजांची काळजी घेऊ आणि सरकारवर बोजा पडू देणार नाही, असे ते म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा