लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पक्षाला कोणत्याही परिस्थितीमध्ये यावेळी बहुमत मिळू नये यासाठी देशात तयार झालेल्या इंडी आघाडीने कशा पद्धतीने खटाटोप केला, खोटा प्रचार केला हे आपण बघितलेलंच आहे. पण आता या खोट्याप्रचाराचा परिणाम भोगायची वेळ इंडिया आघाडी आणि इंडिया आघाडी मधल्या घटक पक्षांच्या नेत्यांवर आलेली आहे. त्यांनी रचलेले जे खोटं होतं ते आता हळूहळू उघड व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि त्याची पहिली शिकार झालेले आहेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जे सध्या जेलमध्ये बसलेले आहेत.