28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
घरविशेष‘आईच्या मृत्यूनंतर मी अधिक धार्मिक झाले’

‘आईच्या मृत्यूनंतर मी अधिक धार्मिक झाले’

अभिनेत्री जान्हवी कपूरने व्यक्त केल्या भावना

Google News Follow

Related

अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या आगामी ‘मिस्टर अँड मिसेस माही’च्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. याच दरम्यान ‘द लल्लनटॉप’ला तिने मुलाखत दिली. तिची आई, अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अचानक मृत्यूमुळे तिचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलला आणि तिला अधिक धार्मिक कसे बनवले, याबद्दल तिने मनमोकळेपणाने मते मांडली.

‘तिचा विश्वास होता की, विशिष्ट तारखांना काही कामे केली पाहिजेत. शुक्रवारी केस कापू नका, हे ती पाळे. कारण त्यामुळे लक्ष्मीला घरात प्रवेश करण्यापासून रोखले जाते, अशी तिची श्रद्धा होती. तसेच, शुक्रवारी काळे कपडे घालणे टाळा, असे ती म्हणत असे. अशा अंधश्रद्धांवर माझा कधीच विश्वास नव्हता. तथापि, तिचे निधन झाल्यानंतर, मी त्यांच्यावर विश्वास ठेवू लागले, कदाचित खूप ठेवू लागले. ती आजूबाजूला असताना मी इतकी धार्मिक आणि आध्यात्मिक प्रवृत्तीची होती की नाही, हे मला माहीत नाही. आम्ही सर्व या प्रथा पाळायचो, कारण ते आई पाळत असे. पण तिच्या निधनानंतर, आपल्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा हिंदू धर्माशी असलेला संबंध मला समजला. मला वाटते की मी आपल्या धर्माचा आधार घेण्यास, त्याचा आश्रय घेण्यास सुरुवात केली,’ असे जान्हवी म्हणाली.

हे ही वाचा:

कोलकाता संघावर बक्षिसांचा वर्षाव

फिरकीपटूंची भेदक गोलंदाजी; गंभीर- नारायणचा मास्टरस्ट्रोक

लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांना एक महिन्याची मुदतवाढ!

मालेगावात माजी महापौरांवर गोळीबार

‘ती नेहमी त्याचे नाव ‘नारायण नारायण नारायण’ म्हणत असे. ती काम करत असताना दरवर्षी तिच्या वाढदिवशी मंदिरात जायची. लग्नानंतर तिने जाणे बंद केले. तिच्या मृत्यूनंतर मी ठरवले. दरवर्षी तिच्या वाढदिवशी मंदिरात जायचे तेव्हा मी खूप भावूक झाले, पण मला खूप मानसिक शांतताही मिळाली,’ असे जान्हवीने मनमोकळेपणाने सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा